☝🏼 माझ्या गावा बद्दल ..
मानुर हे गाव कळवण तालुक्यापासून १ कि.मी अंतरावर पच्छिम दिशेला बसलेले आहे. जिल्ह्यापासून सरासरी ८२ कि.मी आहे. ग्रामीण भागातील जनतेचा शेती ह्या व्यवसाया बरोबर पर्यावरनाच सर्वांगीण विकास व्हावा ग्रामीण भागाचे व गोर गरिबांचे जीवनमान उंचवावे त्यांचा आर्थिक, सामाजिक व सौंस्कृतिक विकाससाठी गावाचे जास्त योग दान असते.
मानुर गाव कळवण नाशिक ह्या मुख्य रस्तावर टेकडीच्या पायथ्याशी बसलेले आहे. फार पूर्वी मनोहर ऋषी या टेकडीवर तपच्र्यासाठी बसले होते. त्यांचे नावावरून मनोहर पुढे अपभाषणे मानूर असे नाव झाले. मानोऱ्या टेकडी उंच आहे. शिवाय आजूबाजूस निसर्गरम्य दृष्य मनोहर दिसते.
गावाजवळ बेहडी व मार्कंडी नद्यांचा संगम आहे. संगमावर शिवालय (आनंदवन) आहे. मार्कंडी नदीच्या किनारी गोरक्षनाथाचे जागृत स्थान आहे. तसेच टेकडीच्या उत्तरेस जवळून गिरणा नदी वळसा घालून वाहते. हा परिसर पूर्वी ऋषी मुनींची तपोभूमी होती.
तसेच ग्रामदैवत हनुमंतराया मार्केंडेश्वर व परमपूज्य ब्रम्हलीन स्वामी गोविंद भारती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रावण महिन्यात आठ दिवस व ग्रंथ दिंडी मिरवणूक व ग्रंथ वाचन व आठ दिवस पहाटे ५ वा काकड आरती व सायंकाळी ६ वा हरिपाठ तसेच महाराष्ट्रतील नामवंत कीर्तनकार बोलाविले जातात. व दररोज सायंकाळी ९ वाजता त्यांचे कीर्तन केले जातात. या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने अखंड हरीनाम सप्ताह परस्पर सहकार्याने कार्यक्रम केला जातो..
गावात शैक्षणिक प्रगती अग्रेसर असून गावात जि.प.ची १ते ४ पर्यंत प्राथमिक शाळा आहे. तसेच आश्रम शाळा असून १ते ७ पर्यंत पो.वे. आश्रमात ८ते १० वी पर्यंत सोय आहे. तेथे मुला मुलींचे स्वतंत्र वसतीगृह व ख्रिश्चन बोर्डिंग आहे. शिवाय शेतकी विद्यालय आणि विज्ञान शाखेचे कनिष्ट महाविद्यालय आहे. या सर्वसंस्थेमध्ये सुमारे ३००० विध्यार्थी अध्ययन करतात.
या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने व परस्पर सहकार्याने राहतात. गावात महिला मंडळ असून त्यांचा लघु उद्योग प्रगती पथावर आहे. तसेच गावात दर वर्षी महादेवाची यात्रा भरते. असे हे मानूर गाव आहे.
तसेच मानूर गावापासून कोल्हापूर फाटा ये १.५कि.मि. अंतरावर असुन. हे वस्तीवर कोल्या डोंगर हे पर्यटनस्थळे सारखे असल्याने त्या ठिकाणी हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी सुठ्ठी च्या दिवशी ट्रकिंग साठी युवा वर्ग जातात. या गावाची लोकसंख्या साधारपणे ५४४८ इतकी आहे. तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेत मजुरी आहे. मुख्यता या गावात कांदा, मका , बाजरी, भुईमूग, गहू, सोयाबीन ,मिरची ,टमाटा . तूर, कोबी ईत्यादी पिके घेतली जातात.
येथील हवामान शेतीला अनुकूल आहे. त्यामुळे हे पिके घेतली जातात.
ग्रामपंचायतीची स्थापना:- सन १९६२
गावाजवळचे बसस्थानक :- कळवण,
गावात पोस्ट ऑफिस आहे.
गावचा पिन कोड ४२३५०१ हा आहे.
गावालत प्रमुख तीर्थस्थळे :- सप्तश्रृंगी गड, मार्कडेय डोंगर, महादेव मंदिर
तालुकापासुंचे गावाचे अंतर :- १ कि.मि.
जिल्हास्तरापासून गावाचे अंतर :- ८२ कि.मि.
आदिवासी लोकांचे कुलदैवत
डोंग-यादेव
नोव्हेंबर/डिसेबर महिन्यात नुकतचं सुरुवात झाल्यास आदिवासी बांधव या सणाची तयारी करतात.यामध्ये नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यामध्ये दोन पोर्णिमा येतात. आणि पहिल्या पोर्णिमेला एक खांब जमिनीत गडला जातो. एक पुराण कथा माहिती असलेला माणुस हा त्या दिवशी एका जागेवर खा्ंब गाडला जातो. त्या वषियी त्या माणसाला सगळं माहिती असतं त्या खांबाच्या जागेला खळी म्हणुन नाव देतात. आणि त्या खांबाच्या शेजारी किंवा खांबाच्या कडापाशी पाच झेंडुची रोपे लावली जातात. त्या खांबाशी एक दिवा पण लावला जातो. तेथे तांदळाच्या पुजा टाकतो हा कार्यक्रम पहिल्या पोर्णिमेच्या आटोपली जात असे.
दुस-या दिवशी प्रत्येक घरातील एक व्यक्ती त्यात शेंगरी देव म्हणुन त्यात सामील होतो. सामील झाल्यानंतर त्या गावा शेजारी जे गाव असते त्या गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन त्या घरांच्या अंगणात देवांची गाणी मोठया आवाजात गाणे गातात. व ते देव जोरजोरात नाचवितात म्हणजेज ब्रम्हदेवासारख्या अशा महान दैवतांचे गाणे लावणे व घराच्या अंगणात नाचणे सुरु असते. त्या घरातील जी कुंटुब चालवणिारी व्यक्ती असते की. ही अंगणशेत नाचणा-या व्यक्ती असतात. त्यांना पण देवाच्या नावाने मोठया आवाजात हाक मारावी लागते. हा कुंटुबप्रमुख नाचगाण्याच्या देवाच्या नावाने भिक्षेच्या स्वरुपात धान्य देतो. अशा प्रत्येक घरोघरी नाचुन जेवढे धान्य सायंकाळी पुन्हा माऊली म्हणेजच देव. आपला जो मुळ खांब गाडलेला असतो. त्या ठिकाणी दिवसभरातील गोळा केलेले धान्य आणले जाते. तेथे झाडांच्या फांदया तोडुन त्यापासुन एक छोटेसे लाकडी घर तयार केलेले असते त्याला कठोर असे म्हणतात.त्या काठारामध्ये आठ दिवसांत जमा केलेले धान्य ठेवले जाते. नवव्या दिवशी मग पुन्हा पौर्णिमेला असते त्या पौर्णिमेला सर्व माऊल्या सायंकाळी ज्या डोंगराला आपला त्याला पण नांव दिले जाते.
गऊल पण गड आणि देऊळ असे त्याला देऊळ असे त्याला नांव दिले जाते. अशा डोंगरांच्या पायथ्याशी जाऊन त्या पौर्णिमेच्या रात्री किंवा तेवढया रात्रीपुरते राहावे लागते ज्या ठिकाणी माऊल्या असतात त्या रात्री वास्तव करतात. तेथे पुन्हा एक खांब गाडला जातो. तेथे पाच झेंडुची रोपे व झाडे लावली जातात मग त्याला तांदळांच्या पुंजा त्यात टाकाव्या लागतात पहाटेच्या वेळेस सर्व माऊल्या उठुन एकत्र येतात. सर्वाना ज्या डोंगराला आपला गऊळ असतो. त्या डोंगरावर चढावे लागते डोंगरावर असलेल्या देवाच्या मूतींची पाया पडतात यर्व माऊल्यांचे दर्शन झाल्यानंतर सर्व माऊल्यांचे दर्शन झाल्यावर सर्व माऊल्या एका रांगेनेच डोंगराच्या पायथ्याशी उतरतात. सर्व माऊल्याचे जे गाव असेल त्या गावाच्या शेजारी येऊन माऊल्याना जावे लागते. त्या खळीला धानी खळी असे म्हणून संबोधले जात असते.
थोड्याच वेळात तेथे बोकडाच बळी दिला जातो. कोबडचांचाही बळी दिला जातो. त्या पशुचा रक्ताचा एक किंवा दोंन थेंब या ठिकाणी दयावा लागतो. एखाघा नवीन व्यक्तीने बघितल्यास त्यांच्या मनात प्रश्न उद्भवतात की.बोकडासारख्या पशुंची आहुती घावीच लागते. काय रक्ताचा थेंब घावाच लागतो. काय.
हा कार्यक्रम आटोपल्यावर नतर दुस-या दिवशी पुन्हा ज्या ठिकाणी गावातील कोठार ज्या खळीवर असते. त्या खळीवर प्रत्येक घरोघरच्या माऊल्यांना उपस्थित राहावे लागते आणि आठ दिवासाची जेवढे धान्य जमा केलेले असते. तेवढे धान्य हे प्रत्येक माऊलीला वाटले जाते.धान्य वाटपपचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या दिवशी हा डोग-यादेव सण संपत असतो. अशा त-हेने आदिवासी विभागात हा सण संपत असतो. अशा त-हेने आदिवासी लोक मोठया प्रमाणात आनंदाने पार पाडतात आणि आनंद लुटतात. त्यामुळे आदिवासी विभागात हा सण एक महान सण म्हणुन साजरा केला जातो.
अशा प्रकारे देवाचा सण साजरा करतात.
मानूर ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.
































